शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अवघा रंग एक झाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:23 IST

इंद्रजित देशमुखवैष्णवांचा मेळा वारीला चाललाय. आज सगळीकडे आनंदीआनंद दाटून आलाय. वारकऱ्यांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहतोय. ‘अवघा रंग एक झाला’ ही अवस्था आहे. सावळा पांडुरंग भेटणार आहे. माहेरची ओढ आणि तेथील सुख याविषयी तन्मयता धारण केलेले मन भान हरपून वारीत समरसून जातंय. खरं पाहिलं तर या वारीसाठी एवढं वेडं का व्हायचं? ...

इंद्रजित देशमुखवैष्णवांचा मेळा वारीला चाललाय. आज सगळीकडे आनंदीआनंद दाटून आलाय. वारकऱ्यांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहतोय. ‘अवघा रंग एक झाला’ ही अवस्था आहे. सावळा पांडुरंग भेटणार आहे. माहेरची ओढ आणि तेथील सुख याविषयी तन्मयता धारण केलेले मन भान हरपून वारीत समरसून जातंय. खरं पाहिलं तर या वारीसाठी एवढं वेडं का व्हायचं? का इतके दिवस सगळी आवराआवर करायची. सगळा संसार सोडून ऊन, पाऊस, वादळ या साºया गोष्टींची तमा न बाळगता पायपीट का करायची? इतर तीर्थांची आणि पंढरी क्षेत्राची तुलना करता नेमकं काय मिळतं या वारीतून, याविषयी तुकोबाराय सांगतात -काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन ।पंढरीची जाण एक यात्रा ।।काशी देह विटंबणे द्वारके जाळणे ।पंढरीसी होणे ब्रह्मरूप ।।अठरापगड जाती याती सकळहो वैष्णव ।दुजा नाही भाव पंढरीसी ।।तुका म्हणे असो अथवा नसो भाव ।दर्शने पंढरीराव मोक्ष देतो ।।काशीची यात्रा आम्ही पापनाशासाठी किंवा पुण्य संपादनासाठी किंवा मरणोत्तर मुक्तीसाठी करतो; पण पंढरीची वारी ही निष्काम वृत्तीने करण्याची आहे. काशीची यात्रा मृत्यू जवळ आला की कराविशी वाटते ती एकदाची घडावी असे वाटते; परंतु पंढरीची यात्रा ही एकदाच आणि मृत्यू जवळ आला आहे म्हणून करायची नाही तर न चुकता दरवर्षी जायचे आहे. काशी यात्रा एकट्याने किंवा कुटुंबीयांसमवेत होते; पण पंढरीची वारी दिंडीबरोबर करायची असते. एकमेकांत मिसळून, समतेचा गजर करीत, जात-पात विसरून करायची असते. कारण वारीमध्ये वारकºयांचा गाव, वर्ण, प्रांत, जात आणि व्यक्तित्त्वही संपूर्ण विलीन झालेले असते. विठ्ठलभक्तीच्या भरतीने ओसंडून वाहणारा तो एक जनसागरच असा असतो. या जनसागरातील व्यक्ती आस्तिक असो वा नास्तिक, तो जनमानसाच्या व्यापक हृदयाचा मोक्ष अनुभवतोच. तुकोबाराय आणखी एका अभंगात म्हणतात -वाराणसी गया पाहिली द्वारका ।परि नये तुका पंढरीचा ।।पंढरीच्या लोका नाही अभिमान ।पाया पडेजन एकमेका।।तुका म्हणे जाये एक वेळा पंढरी ।तयाचिया घरी यम न ये ।।इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी थोडासा विरंगुळा मिळेल; पण आयुष्याचा विसावा मिळण्याचे ठिकाण हे पंढरपूर आहे. याचे कारण पंढरपुरामध्ये माणसाचा अभिमान नाहीसा होण्याची एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये समोरच्या प्रत्येकामध्येच पांडुरंग आहे यावर श्रद्धा ठेवून एकमेकांचे जीवभावे दर्शनाची रीत आहे. सात वर्षांचा मुलगा सत्तर वर्षांच्या आजोबांच्या पाया पडतो आणि सत्तर वर्षांचा आजोबा सात वर्षांच्या बाळाच्या पाया पडतो. एकमेका पायी लागण्याच्या व्यवस्थेत ‘जन हेचि जनार्दन’ याचा बोध इथे मिळतो. अभिमान माणसाला घातास कारण ठरतो. अहंकार संपणे ही परमार्थातील उच्चतम अवस्था आहे. जिथे अहंकार संपतो तो कळी आणि काळालाही घाबरत नाही. अहंकार निर्मूलनाचे हे साधे, सोपे आचारधर्म वारकºयाला विश्व कवेत घ्यायला मदत करतात. वारीच्या सहभागासाठी अलीकडे हौशे, गवशे, नवशे लोक येताहेत. हौशे लोक तर जगभरातून येताहेत. हौसेने हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी काही श्रद्धाळू नवसे नवस फेडण्यासाठी येतात. काही गवशे काही मिळविण्यासाठी येतात. वारकºयाला मात्र काहीच मागायचे नाही. त्याचे हे निष्काम व्रत आहे. त्याला देवाजवळ स्वत:साठी काहीच मागायचे नाही, कारण या यात्रेतील शेवटची प्रार्थना ही पसायदानाची असते, ज्यामध्ये एकट्याचे कल्याण नाही. मागितले तर अवघ्या विश्वाचे कल्याण मागितले आहे. या यात्रेच्या निमित्ताने त्याला हवे आहे चंद्रभागेचे स्नान, पांडुरंगाचे दर्शन. बस्स दुसरे काही नको. फक्त दर्शने समाधान याच वृत्तीने ही लक्ष लक्ष पाऊले वाट चालत आहेत. तीच पाऊले देखणी जी परब्रह्म भेटी चालती. भवसागर तुटोनिया परमशांती अनुभवती. या यात्रेतल्या वारकºयांची विठ्ठलावर आणि वारकरी संतांवर अपार श्रद्धा आहे. ही वाट चालताना विठ्ठल आणि संतजनांच्या नुसत्या आठवणीनेही त्यांच्या अंगावर शहारे येतात. कंठात गहिवर दाटतो. डोळ्यात पाणी साचते, म्हणूनच पंढरीच्या यात्रेला दुसºया कुठल्याच यात्रेची सरयेणार नाही, कारण या यात्रेची फलश्रुती हीच आहे की,भाग गेला शीण गेला ।अवघा झाला आनंदु ।।(लेखक संत साहित्याचे अभ्यासक तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)